Homeताज्या बातम्याशिवसेना–रिपब्लिकन सेनेची युती : ‘विचार, विश्वास आणि विकास’ हे त्रिसूत्री लक्ष्य

शिवसेना–रिपब्लिकन सेनेची युती : ‘विचार, विश्वास आणि विकास’ हे त्रिसूत्री लक्ष्य

 

मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी

 

राज्यात सामाजिक न्याय, समता आणि विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन सेना यांनी आज औपचारिक युतीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात ही घोषणा करण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

युतीची घोषणा करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालते, तर दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा. आजपर्यंत ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केलं; आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करतो. संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करत राहू.”

ते पुढे म्हणाले, “सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी व्हायला हवा. विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करायचे आहे. शिवशक्ती–भीमशक्तीची ही युती कार्यकर्त्यांचीच युती आहे, त्यामुळे नक्कीच यशस्वी होईल.”

 

यावेळी विरोधकांवर टीका करत शिंदे म्हणाले, “संविधान कधीच धोक्यात नव्हते, मात्र विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार केला. आता त्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं आहे. जोवर सूर्य–चंद्र आहेत, तोवर डॉ. बाबासाहेबांचं संविधान कायम राहील.” तसेच, इंदू मिल येथे “जगाला हेवा वाटेल असं भव्य स्मारक उभं राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले, “या युतीमुळे राज्यात सामाजिक व राजकीय बदल घडतील. शिंदे यांनी आधीच वर्षावास कार्यक्रम घेऊन आंबेडकरी समाजाला सन्मान दिला, आता कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतील, अशी खात्री आहे.”

 

युतीनंतर दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन राज्यभर विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!