कंत्राटदारास पाच दिवसांत दुरुस्तीस आदेश…
मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी
गत वर्षी प्रवाशांच्या सेवेत आलेला अटल सेतूची किर कोळ झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. जोरदार पाऊस व अविरत वाहतुकीमुळे सेतूची झीज झाल्याचा दावा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने केला आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त व प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी आज अटल सेतूची पाहणी केली.
विक्रम कुमार यांनी आज सकाळी २२ किमी लांबीच्या संपूर्ण अटल सेतूची पाहणी केली.
या पाहणीत एमएमआरडीएच्या पथकाने नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील केवळ २ किमी पट्ट्यात (कि.मी. १४ ते १६ दरम्यान) काही ठिकाणी पृष्ठभागावर किरकोळ झीज झाल्याचे निदर्शनास आणले. सततचा जोरदार पाऊस आणि अविरत वाहतूक प्रवाह ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानुसार, कंत्राटदार देऊ–टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांना हा भाग पुढील पाच दिवसांत दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.
एमएमआरडीने आतापर्यंत कंत्राटदारावर केलेल्या कारवाईत १ कोटी दंड आकारण्यात आला असून जानेवारी २०२६ मध्ये संपणारा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड एका वर्षाने वाढविला.पावसाळ्यानंतर प्रभावित भाग पूर्णपणे नव्याने तयार करणे तेही कंत्राटदाराच्या स्वखर्चाने, डेंस बिट्युमिनस मॅकॅडम व ॲस्फाल्ट काँक्रीट चा वापर करून बनविणे. असे निर्देश देण्यात आले.
एमएमआरडीएच्या पथकाने स्पष्ट केले की, अटल सेतू रचनात्मकदृष्ट्या भक्कम व सुरक्षित आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची शाश्वती राखण्यासाठी वेळेवर कारवाई आणि कठोर देखरेख केली जाईल, अशी हमी प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.




















