Homeताज्या बातम्याडिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा; फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० वर संपर्क...

डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा; फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० वर संपर्क करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२४.( अजय मगरे )

डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर संकल्पना अस्तित्वात नाही. अशा प्रकारचा फोन, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो सरळ फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केले.

 

राज्यात, विशेषतः मुंबई आणि अहिल्यानगर येथे “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली होत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांबाबत आमदार अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही भामटे स्वतःला पोलीस किंवा कस्टम अधिकारी म्हणून ओळख देतात. ते नागरिकांना त्यांच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचा बनाव करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगून स्क्रीनसमोरून हलू नये, अशी धमकी दिली जाते. भीतीचे वातावरण निर्माण करून मोठी रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.

 

या फसवणुकीत सामान्य नागरिकांसह उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीही बळी पडले आहेत. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाही लाखो रुपयांचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. या गुन्ह्यांचे जाळे परदेशातून चालवले जाते, तर देशातील काही लोक ‘हँडलर’ म्हणून काम करतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे. जर कोणाकडून चुकीने पैसे ट्रान्सफर झाले असतील आणि त्यांनी तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली, तर बँकांच्या समन्वयातून संबंधित रक्कम गोठविणे शक्य होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...
error: Content is protected !!