Homeताज्या बातम्याडीआरपीची ‘की-टू-की’ घोषणा हवेतच...

डीआरपीची ‘की-टू-की’ घोषणा हवेतच…

धारावी गणेश नगर – मेघवाडीतील रहिवाशांना नोटिसा; भाडे घ्या, घरे खाली करा—तात्पुरते स्थलांतर लादल्याचा आरोप

मुंबई, दि. १६ : मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) सुरुवातीपासूनच धारावीतील रहिवाशांना ‘की-टू-की’ पद्धतीने घरे देणार, कोणालाही संक्रमण शिबिरात पाठवले जाणार नाही, अशी ठाम घोषणा डीआरपी कडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या घोषणेला हरताळ फासला जात असून, डीआरपी सेक्टर-१ मधील गणेश नगर–मेघवाडी परिसरातील सुमारे ४२ कुटुंबांना अचानक नोटिसा देत भाडे स्वीकारून तात्पुरत्या स्थलांतरास भाग पाडण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी “काही रहिवाशांचे स्थलांतर अपरिहार्य आहे,” असे सांगत दरमहा १८ हजार रुपये भाडे देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र मुंबईतील वाढत्या घरभाड्याच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अपुरी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच संक्रमण शिबिरात घरे न देता भाड्यावर पाठवणे म्हणजे ‘की-टू-की’च्या वचनालाच छेद असल्याची टीका रहिवाशांकडून केली जात आहे.

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी मेघवाडीतील ४२ झोपड्या हटविणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासाठी आधीच रहिवाशांशी सुसंवाद साधता आला असता, तर अचानक नोटिसा देण्याची गरज भासली नसती, असे रहिवाशांचे म्हणने आहे. “आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही; मात्र भाड्याऐवजी संक्रमण शिबिर दिले पाहिजे,” असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

भाडे सहाय्य, ब्रोकरेज तसेच आगाऊ १२ महिन्यांचे भाडे देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, पात्रतेचे निकष आणि पुढील टप्प्यांबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे. “सन्मानाने जगण्याचे आश्वासन दिले जात असताना, घरे रिकामी करण्यासाठी दबाव का?” असा थेट प्रश्न स्थानिक रहिवासी सलीम भाई विचारत आहेत.

एकीकडे पुनर्विकासाचे गोडवे गायले जात असताना, दुसरीकडे ‘की-टू-की’चे वचन मोडून संक्रमण, स्थलांतर आणि अनिश्चिततेचा फटका सामान्य धारावीकरांना बसत असल्याचे चित्र सध्या धारावी परिसरात दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!