Homeताज्या बातम्यामहिला दिनानिमित्त आरोग्य सेविकेचा गौरव; मुकता केकाने यांचा २० वर्षांचा सेवाभावी प्रवास...

महिला दिनानिमित्त आरोग्य सेविकेचा गौरव; मुकता केकाने यांचा २० वर्षांचा सेवाभावी प्रवास प्रेरणादायी

कोपरगाव, दि.९. प्रतिनिधी

 

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण भागात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुकता सोमनाथ केकाने यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे. सिन्नर तालुक्यातील रा. निराळे येथील अतिशय साध्या आणि गरीब कुटुंबातून येत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आरोग्य सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नाशिक येथे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर १८ ऑगस्ट २००६ रोजी आरोग्य सेविका (परिचारिका) म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास २० वर्षे त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे.

 

त्यांनी काम सुरू केले त्या काळात मोबाईल, इंटरनेट किंवा लॅपटॉपसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही समाजाशी असलेली बांधिलकी आणि गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने काम केले. दुर्गम खेड्यांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेणे, महिलांची तपासणी करणे, वयोवृद्धांची काळजी घेणे तसेच बालकांना लसीकरण व औषधे देणे अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली.

 

सध्या त्यांची बदली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सापगाव उपकेंद्र येथे झाली असून तेथेही त्या तितक्याच समर्पितपणे सेवा देत आहेत.

 

महिलांची जिद्द आणि कर्तृत्व कसे असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुकता केकाने यांचा २० वर्षांचा सेवाभावी प्रवास होय. त्यांच्या या कार्याबद्दल जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...
error: Content is protected !!