कला शाखेतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; नम्रता मिसाळ केंद्रात प्रथम
दावरवाडी, दि.५.( अभिजीत सोनवणे )
नांदर येथील सूर्यकांत धुपे सर माध्यमिक विद्यालयचा इयत्ता बारावीचा निकाल यंदा ८१.८१ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत नम्रता मिसाळ हिने ७१.५० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ती परीक्षा केंद्रातूनही कला शाखेत प्रथम आली आहे. कल्याणी जाधव हिने ६८.३३ टक्के गुणांसह द्वितीय, साधना सोनवणे हिने ६६.६७ टक्के गुणांसह तृतीय, तर तरन्नुम शेख हिने ६५.५० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गूलालकर, सौ. सुरेखा राऊत मॅडम आणि प्रा. दीपक पिवळ यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.
विद्यालयातील कर्मचारी योगेश धुपे, मदन ठेणगे, गोरक्षनाथ सोनवणे, सतीश कदम आदींनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास शिक्षकवर्गाने व्यक्त केला.




















