कोपरगाव, दि १० मे ( दिलीप गायकवाड )
कोपरगांव शहरातील धम्मदिप बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा निमित्त भव्य व धम्म मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन, सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भिक्खू अमृतानंद बोधी (थेरो), भिक्खू आनंद सुमनसिरी (थेरो), भिक्खू कश्यपजी आणि भिक्खू भारद्वाजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहणाने होणार असून, त्यानंतर सकाळी ९:३० वाजता बुद्ध, धम्म आणि संघ वंदना तसेच सुत्तपठन होईल.या दिवशी कोपरगाव शहरातून बुद्ध मूर्तीची मंगल मैत्री रॅली (मिरवणूक) अश्वरथा मार्गे काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी ६:३० वाजता सुरू होऊन रात्री ८:१५ वाजता संपेल.
यानंतर आदरणीय भिक्खू संघ यांची धम्म देशना आयोजित करण्यात आली आहे.कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ९:१५ वाजता स्नेहभोजनाने होईल.
हा कार्यक्रम धम्मदिप बुद्ध विहार, मार्केट यार्ड रोड, कोपरगाव येथे पार पडणार असून, भारतीय बौद्ध महासभा, माता रमाई महिला मंडळ, समता सैनिक दल, धम्ममंगलज्ञान बुद्धिस्ट फाउंडेशन सह अन्य बहुजन बौद्ध उपासक-उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी या धम्म व सामाजिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



















