मुंबई, दि.३०(प्रतिनिधी )
राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक ४२.२ मिमी पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्गमध्ये ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील इतर भागांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – रायगड ०.३ मिमी, रत्नागिरी ३.९, पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४, जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सातारा १, सांगली ०.९, कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, लातूर ५.१, नांदेड ९.३, परभणी ३, हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५, वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५ मिमी.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले आहेत. सुदैवाने या पावसामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र, राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे रस्त्यावरील दरड तात्काळ हटवण्यात आली असून सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.




















