Homeताज्या बातम्याम्हाडाचा १५ वा लोकशाही दिन ९ फेब्रुवारीला..

म्हाडाचा १५ वा लोकशाही दिन ९ फेब्रुवारीला..

उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चा व तात्काळ निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

म्हाडाचा पंधरावा लोकशाही दिन सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल भूषविणार आहेत.

जानेवारी २०२४ पासून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नियमितपणे म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून, आतापर्यंत १४ लोकशाही दिनांचे यशस्वी आयोजन झाले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा करून तात्काळ निर्णय घेतले जात आहेत.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक व त्वरित न्याय मिळत आहे.

प्रत्येक लोकशाही दिनापूर्वी मागील लोकशाही दिनात घेतलेल्या निर्णयांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा स्वतः जयस्वाल घेतात. यामुळे प्रशासनाची उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट झाली असून, नागरिक व प्रशासन यांच्यातील विश्वासाचा दुवा अधिक मजबूत झाला असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रार अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आपले अर्ज लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये सादर करावेत. विहित नमुना अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) ‘नागरिकांसाठी’ या विभागातील ‘लोकशाही दिन’ या सदरात उपलब्ध आहे.

निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाचे असावे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व अथवा अपील्स, सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबी, अपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेले अर्ज तसेच यापूर्वी अंतिम उत्तर देण्यात आलेल्या विषयांवरील पुनरावृत्ती अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. स्वीकृत न होणारे अर्ज संबंधित विभागाकडे आठ दिवसांच्या आत पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जातील, तसेच त्याची प्रत अर्जदारालाही देण्यात येईल, असे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ' प्रज्ञा फाऊंडेशन ' कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील आठवड्यात ‘या’ भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण...

मुंबई: मुंबईतील जलवाहिन्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि नवीन जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मात्र, या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवार, ५ मे आणि...

मोबाईलवर अचानक ‘Extreme Alert’चा धक्का! देशभरात खळबळ… पण सत्य काय?

मुंबई -मंगेश म्हात्रे  आज अचानक हजारो नागरिकांच्या मोबाईलवर “Extremely Severe Alert” असा संदेश झळकताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला—हा...

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या

पुणे : भोरमध्ये 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 65 वर्षीय वृद्धाची हत्या पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका गावात एका चार वर्षांच्या मुलीवर...

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ' प्रज्ञा फाऊंडेशन ' कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील आठवड्यात ‘या’ भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण...

मुंबई: मुंबईतील जलवाहिन्यांच्या मजबुतीकरणासाठी आणि नवीन जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मात्र, या कामामुळे पुढील आठवड्यात मंगळवार, ५ मे आणि...

मोबाईलवर अचानक ‘Extreme Alert’चा धक्का! देशभरात खळबळ… पण सत्य काय?

मुंबई -मंगेश म्हात्रे  आज अचानक हजारो नागरिकांच्या मोबाईलवर “Extremely Severe Alert” असा संदेश झळकताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणांतच सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला—हा...
error: Content is protected !!