एसआरए विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे १३ मे रोजी आंदोलन;
‘ विकासकांकडून फसवणूक’ झाल्याची रहिवाशांचा आरोप
मुंबई,दि.८ (प्रतिनिधी)
भारत मुक्ती मोर्चा आणि वांद्रे (पूर्व) येथील भारत एकता सोसायटीच्या रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) म्हाडा आणि विकासकांवर फसवणूकीचा आरोप करत,१३ मे रोजी दुपारी १२:०० वाजता वांद्रे पूर्व येथील, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सीटीएस क्रमांक ७६४३(पा) चाळ क्रमांक ५३ ते ६४ या भूखंडावर एसआरए योजनेत विकासका कडून फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेसाठी ज्या प्रसिध्द विकासकाला नेमण्यात आले आहे. परंतु, रहिवाशांचा आरोप आहे की, हा प्रकल्प अनेक नियमांचे उल्लंघन करून, विकासाच्या नावाखाली हा विकासक जमीन घोटाळा करून स्थानिकांची फसवणूक करून राबवित असल्याचा आरोप रहिवाशी करतआहे.
या संदर्भात २३ एप्रिल २०२५ रोजी संबंधित म्हाडा आणि एसआरए’च्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र, आजतागायत कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने रहिवाशांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. भारत मुक्ती मोर्चाच्या पुढाकाराने होणाऱ्या या आंदोलनात स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
आंदोलनाचे संयोजक जावेद अन्सारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे सूचना पाठवून, १३ मे रोजी होणाऱ्या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, तक्रारीतील मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन प्रकल्पा संबंधित कामकाज तत्काळ थांबवावे.
या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहनिर्माण मंत्री, एसआरएचे सीईओ, म्हाडाचे उपाध्यक्ष, तसेच मुंबई पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी यांना ईमेलमार्फत देण्यात आली असल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे नेते जावेद अन्सारी यांनी बहुजन शक्तीला सांगीतले.




















