Homeताज्या बातम्याबारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान मोठा अपघात

बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान मोठा अपघात

बारामती.दि.२८, ( प्रतिनिधी )

बारामतीत आज सकाळी घडलेल्या गंभीर विमान अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंगदरम्यान अपघातग्रस्त झाले. प्राथमिक व अधिकृत सूत्रांनुसार या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, त्यामध्ये अजित पवार यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बारामती तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच प्रचार सभांसाठी अजित पवार यांचे चार कार्यक्रम नियोजित होते. त्यासाठी ते सकाळी विमानाने बारामती विमानतळावर येत होते. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूला जाऊन जोरात आदळले. त्यानंतर विमानाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

प्रथमदर्शनी धावपट्टीवर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात इतका भीषण होता की विमानातील काही प्रवासी जागेवरच ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

बचाव व शोध मोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा धावपट्टीशी संबंधित अडचण यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला, याबाबत चौकशी सुरू आहे.

नागरी नागर विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघाताची बातमी पसरताच बारामती विमानतळ परिसरात आणि आसपासच्या भागात नागरिकांची मोठी गर्दी जमली. राज्यातील राजकीय वर्तुळातही या घटनेमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणांकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!