Homeताज्या बातम्याठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा – 

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा – 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 खड्डे मुक्तीसाठी उत्तम तंत्रज्ञान वापरण्यावर भर

 

ठाणे, दि.४ : अजय मगरे

 

ठाणे आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित समन्वय साधावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 

ठाण्यात कोपरी, माजिवडा, घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल मार्ग आणि शिळफाटा परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांमधून सतत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित उच्चस्तरीय बैठकीत शिंदे यांनी वाहतूक व्यवस्थापनातील अपयशावर नाराजी व्यक्त केली.

या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दूरध्वनीद्वारे सूचनाही देण्यात आल्या.

 

गायमुख घाट येथील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही याकडे लक्ष वेधत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी परिसरात वाहतुकीचे योग्य नियोजन करून कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करणे, उंचवटे तयार होऊ न देणे आणि अपघातांची शक्यता टाळणे या बाबींवर विशेष भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. खड्डे मुक्ती हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याने, उपलब्ध असलेले आधुनिक व कार्यक्षम तंत्रज्ञान वापरून हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!