Homeताज्या बातम्यावरळीतील टॅक्सी चालकांचा एसआरए विरोधात एल्गार..

वरळीतील टॅक्सी चालकांचा एसआरए विरोधात एल्गार..

२५ वर्षांपासून रखडलेली ‘ इंदिरा ‘ योजना तातडीने सुरू करण्याची मागणी…

मुंबई, दि. २३ : मंगेश म्हात्रे

बहुजन शक्ती टॅक्सी चालक मालक सहकारी संघटनेच्या वतीने वरळीतील टॅक्सी चालक व रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेली एसआरए योजना तातडीने सुरू करून रहिवाशांना हक्काची घरे द्यावीत, या मागणीसाठी संघटनेने एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले आहे.

वरळी नाका परिसरातील प्रेमनगर व सिद्धार्थनगर येथे असलेली इंदिरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था सन २००२-०३ मध्ये स्थापन झाली होती. या योजनेअंतर्गत त्या काळात झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर तब्बल २५ वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही.परिणामी येथील अनेक टॅक्सी चालक व रहिवाशी आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. विशेष म्हणजे संबंधित विकासकाने या संपूर्ण कालावधीत कोणतेही मासिक भाडे दिले नसल्याचा आरोप रहिवाशांनी निवेदनात केला आहे.

एकीकडे भाड्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, दुसरीकडे संस्थेची एक अर्धवट अवस्थेतील इमारत उभी असून मूळ इमारतीचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत. आमच्या मालकीचे घर कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर देण्यास एसआरए आणि विकासक दोघेही अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर एसआरएने वैयक्तीक लक्ष घालून योजना रखडविणाऱ्या  संबंधितावर कठोर कारवाई करावी, रखडलेली योजना तातडीने सुरू करावी आणि रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी बहुजन शक्ती टॅक्सी चालक मालक सहकारी संघटनेने केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!