माझं गाव माझा अभिमानाचे मुख्याधिकाऱ्याला निवेदन
कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरात ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० अन्वये तसेच शासन निर्णय क्र. संकीर्ण-२००९/अनो.स.२२/प्र.क्र.११६/नवि-२० नुसार शहरी भागातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालयांच्या परिसरात किमान १०० मीटरचा ‘शांतता क्षेत्र (सायलेंट झोन)’ तातडीने जाहीर करून आवश्यक सूचना फलक लावावेत, अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी शांतता क्षेत्र घोषित करून त्याठिकाणी ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मात्र कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून रुग्ण, विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास शुक्रवार, ७ मार्च २०२६ रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास शुक्रवार, ७ मार्च २०२६ रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती अहिल्यानगर जिल्हाधिकारी, कोपरगाव तहसीलदार व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत. “माझं गाव माझा अभिमान” या अभियानांतर्गत शहरात शांतता, शिस्त व कायद्याची अंमलबजावणी व्हावी,असे विनय भगत ,मयुर आव्हाड, विजय जाधव, अमित आढाव या आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे याबाबत जनआंदोलन पुकरले जाईल असे ही यांनी सांगितल .




















