Homeताज्या बातम्याचैतन्य नगरातील रहिवाशांचे ग्रामपंचायतीकडे सामूहिक निवेदन ;

चैतन्य नगरातील रहिवाशांचे ग्रामपंचायतीकडे सामूहिक निवेदन ;

 

रस्ता द्या, घंटागाडी सुरू करा, ओपन स्पेसमध्ये सीबिबट्याचा वावर!

 

कोपरगाव, दि.१८ : ( चंद्रकांत जोर्वेकर )

 

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चैतन्यनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या मूलभूत समस्या मांडत सामूहिक निवेदनाद्वारे सरपंच सतीश केकाण,ग्रा.सदस्य भाऊसाहेब भाबड आणि ग्रा सदस्य नाईक सर यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 

रहिवाशांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून वर्षभरापासून घंटागाडी न आल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात चिखल व घाण, तर उन्हाळ्यात धूळ व दगड यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिणामी, परिसरात आजारपण वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

याचबरोबर, धारणगाव रोड लगतच्या चैतन्यनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. ओपन स्पेसमध्ये सुमारे वीस फूट उंच बाभळी वाढल्या बिबट्याला लपण मिळाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

निवेदनात रहिवाशांनी पुढील मागण्या केल्या आहेत;

चैतन्यनगरमधील ओपन स्पेसची तातडीने साफसफाई करावी.

रस्त्यांची दुरुस्ती अथवा नवीन रस्ता बांधून द्यावा.

नियमित घंटागाडी सुरू करून स्वच्छतेची व्यवस्था करावी.

 

“आमच्या सामूहिक निवेदनावर तातडीने लक्ष घालून ग्रामपंचायतीने आवश्यक ती कारवाई करावी,” अशी ठाम मागणी चैतन्य नगरातील रहिवाशी सुकदेवराव जाधव,अनिल जाधव, निलेश जगताप,राजेंद्र वाघ,सुनील शिंदे, अजय शिंदे,सुनील कोंढारे,राहुल नरोडे,अनिल कानडे,सुनील पवार,सुरेश कोळी,भोलानाथ लकारे,अशोक बोराडे,गणेश शेळके,विभावरी मसाने, दीपक गरजे, गवंडी एलजी,विठ्ठल धनाड, कल्पना उंबरकर

सुभद्राबाई जाधव,शितल जगताप,कामिनी त्रिभुवन,मिना वाघ,शारदा नरोडे,उज्वला कोंढारे

पूजा गरजे, गिरीजा कानडे,कोमल पवार,अलका मगर, काजल कोळी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!