Homeताज्या बातम्याठाण्यात मराठी नामफलक वाद;

ठाण्यात मराठी नामफलक वाद;

 

शाळांचा सर्व व्यवहार मराठीत करण्याची काँग्रेसची मागणी

ठाणे, दि. ४ : अजय मगरे

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळांना मराठी नामफलक लावणे सक्तीचे केले असतानाच आता यावरून नवे राजकीय समीकरण तापू लागले आहे. “नामफलकापुरतेच मर्यादित नका राहू; शाळांचा सर्व व्यवहार मराठीतच व्हावा,” अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

शासनाच्या २०१४ च्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मनपाने आठ दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, काँग्रेसने हा निर्णय अपुरा असल्याचे सांगत शाळांतील पत्रव्यवहार, रोजनिशी, अर्ज, हजेरी, हिशेब, निकालपत्रे यासह सर्व कागदपत्रे मराठीतच असावीत, असा ठाम आग्रह धरला आहे.
मराठी ही राज्यभाषा असून ती केवळ फलकांपुरती मर्यादित ठेवणे हा मराठीचा अपमान आहे. मुलं मराठीत शिकतात, पण शाळेच्या ऑफिसातील व्यवहार इंग्रजी किंवा हिंदीत होतात. खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा सर्व कागदपत्रे मराठीत मिळतील,” असे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजप-शिवसेना केवळ नामफलकांवर भर देत असताना, काँग्रेसने दैनंदिन व्यवहाराचा मुद्दा पुढे आणल्याने राजकीय तापमान वाढले आहे.

दरम्यान, मराठीवादी संघटनांनीही या मागणीचे स्वागत केले आहे. “फलकापुरते आदेश मर्यादित ठेवले, तर मराठीची उपेक्षा थांबणार नाही. शाळांचे सर्व व्यवहार मराठीत झाल्यासच मुलांना खरी मातृभाषेची ताकद मिळेल,” असे स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे.
ठाण्यातील अनेक पालकांनीही यास पाठिंबा दर्शवला आहे. आता ठाणे मनपा शिक्षण विभाग पुढील निर्णयात फक्त नामफलकांपुरते थांबते की सर्व व्यवहार मराठीत करण्यास सुरुवात करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...
error: Content is protected !!