महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे” – नितीन शिंदे
कोपरगाव,दि.२३ : ( दिलीप गायकवाड )
२५००, हा उस दर शेतकऱ्यांवरील अन्याय असून महायुती सरकार शेतकऱ्यांची उघड फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव, कर्जमुक्ती यांसारख्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचे घटक पक्ष राजकीय नौटंकी करत आहेत.”

शिंदे यांनी पुढे म्हटले की, मागील विधानसभा निवडणुकीत कोपरगाव तालुक्यासाठी ३ हजार कोटी निधी आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र आज रस्ते, पाटपाणी, वीजपुरवठा, सुरक्षा व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत.
काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, जोपर्यंत शेतकऱ्यांना माळेगाव-बारामतीप्रमाणे ₹३७००/- पेक्षा जास्त दर मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. तसेच तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी एकत्र येऊन आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे शेतकरी कर्जमुक्ती व उस दराच्या प्रश्नाबाबत ठोस शिफारस करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.




















